Tuesday, September 1, 2009
देव नसल्याची अजून एक 'अनुभूती'
आज पुन्हा मित्रांशी भांडलो. विषय तोच, देव! मी नेहमीप्रमाणे ठाम देव नाही म्हणून. पण मग अशी एक शक्ती असते जी सारे नियंत्रित करत असते, असा जुनाट, पुचाट झालेला विचार (देवाइतकाच) आमचा मैत्रिणीने मांडलाच. शेवटी ज्याची त्याची अनुभूती आहे, असे सांगून गप्प बसलो. मग एकदम दाभोलकर आठवले. देवासाठी आपण जे जे करतो तो कार्यकारण भाव आहे तो महत्वाचा. बाकी सारे थोतांड. मी मात्र अचंबित. आईने सांगितले होते म्हणून चतुर्थी करायचो, आता तर चातुर्थीलाही नॉन वेज चालते. एकदम बदल ? खरे तर मला हि अनपेक्षित होते पण आता काही वाटत नाही. कधी तरी थेऊरलाही गेलो होतो. पण दाटून आले नाही. तोच देव, तितकाच माणसाला निष्क्रिय बनविणारा. माणसे मात्र वेडी, आप्ताजानांकडे दुर्लक्ष करून देवाला पुजणारी. आधी श्रद्धा, भक्ती, देव म्हटले कि नकळत हात जोडले जायचे आता साधे तरंगही उठत नाही. कारणे अनेक आहेत, मला सापडली कि सांगेन.
Subscribe to:
Comments (Atom)