Monday, October 5, 2009
'तत: किम'
'जाती पाती जुनाट भिंती,पाडूनी टाकू घडवू क्रांती', या गीताच्या ओळी आमच्या पत्रकार, कार्यकर्ता, सहकारी मित्राने ऐकवल्या. जुन्या आठवणीत ते रमले, मलाही रमवले! कधी प्रबोधीनिमुळे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचात निर्माण झालेली उर्मी तर कधी नर्मदा बचाव आंदोलनात केलेले कार्य, सार्याचा पट त्यांनी मांडला. त्यांचे भारावून जायचे ते दिवस होते. माझा पिढीला असे भारावून जाता आलाच नाही. मोठी माणसे भेटलीत पण त्यांचे पाय मातीचे दिसलेत. तुलेनेने हे नशीबवान निघाले. ''दहा वर्षांच्या पत्रकारीतेनंतरहि माझातला कार्यकर्ता मला जिवंत ठेवायचा आहे,'' असे सांगताना त्यासाठी त्यांची चाललेली तळमळ मलाही स्पर्शून गेलीच. दहा वर्षांपूर्वी नर्मदा बचाव आंदोलनातला सहभाग, प्रबोधीनितले त्यांचे 'पूर्णवेळ' असतानाचे दिवस, अण्णा हजारेंचा गावात जाऊन केलेले काम, सारं तनामनावर संस्कार करणाऱ्या दिवसांचा कॅनव्हास ते चितारत होते आणि मी मात्र त्यातून माझे कोलाज शोधात होतो. आमचे वय सारखे नाही, अनुभव सारखा असणे तर दूरच. पण एक धागा मात्र समान. विचारसरणी म्हणता येणार नाही पण जुनी पद्य एकली कि भारावून जाणे कदाचित हेच सारखेपण. त्यातच त्यांनी 'तत: किम' (तरी सुद्धा) हे पद्य गुणगुणले. मला चाल माहित नाही. पण एक ओळ मात्र थेट भिडलीच.. ''क्षणाचीच आरास जाईल हि वाया, जरी जीवनी राष्ट्रसेवा घडेना!'' अर्थात माझा मनातील आंदोलने क्षणिक नाहीत हे मला ठावूक आहे. आताशा कुठे माझा समस्यांची जाणीव होते आहे; समाजाच्या समस्या कधी समजून घेणार? त्यात व्याप वाढत आहेत. पण माझे हे पत्रकार कम कार्यकर्ता मित्र मला नेहमी सांगतात,' तुझा वयाचा असताना मी हि असाच होतो.! ''
Friday, October 2, 2009
Subscribe to:
Comments (Atom)