माझ्या हातरुमालाइतके (कदाचित कमीच) कपडे अंगावर असलेल्या अनेक पर्यटक गोव्याचा कलंगुट, अंजुना, सिकेरी, वाघातूर बीचवर भारतीय संस्कृती पाहायला येतात; आणि भारतीय पर्यटक त्यांना. हे गोव्याचे पर्यटन! तुम्हाला गोवा अनुभवायचा असेल तर ग्रामीण भागात जा. ग्रामीण भागात गेल्यावर मी 'माझ्या गोव्याच्या भूमी' तला गोवा अनुभवला.
लाल मातीतले वळणाचे रस्ते. पहाटेचे धुके. नारळी- पोफळीचा बागा. आणि सांस्कृतिक वातावरण. आणि
तियात्र. तियात्र हा इथला आवडता कलाप्रकार. तीयात्रात कितीही संख्या असू शकते. लाइव म्युझिक हे तीयात्राची खासियत. माशासारखे सुंदर डोळे (इथल्या मुलींचे हे वैशिष्ट्य) असलेल्या नटया . त्यांचा समवेत पुरुषांचा कसदार अभिनय . तियात्र म्हणजे साडेतीन तासांचे ज्वलंत विषयावर भाष्य करणारे रोमन नाटक. अफलातून प्रकार आहे. तियात्र म्हणजे पोर्तुगीज भाषेत नाटक.
तीयात्रातील कांताराच्या ( कोंकणीत गीत) काही ओळी -
हि आयाजकालची भुरगी केन्ना शिकपाना, फकत चेडवा बराबर रावून करता पिशेपणा, फ्रेंड- फ्रेंड म्हणोन सगळ्यांच्या घालतात काना...... आनी मोगचो फोग जाऊन पडतात फोणा.
(माझे सहकारी शेखर नाईक हे स्वतः उत्तम कलाकार आहेत. त्यांचा कडून ऐकलेल्या या काही ओळी. एका दमात या ओळी म्हणायच्या हे विशेष. शेखरविषयी नंतर कधीतरी.)
Monday, January 18, 2010
Saturday, January 16, 2010
देव बरे करो म्हंता !
देव बरे करो म्हंता !
हि गोव्याची आभार प्रदर्शनाची पद्धत. म्हणजे एखाद्या कार्यक्रमात आभार मानायचे असल्यास तेंका देव भले करो म्हंता, असे म्हटले कि झाले. फुटकळ, फाटकळ , चोरलेल्या कविता न वापरता देव बरे करो म्हंता, असे म्हणायचे. आवडली बुवा आपल्याला हि पद्धत.
हि गोव्याची आभार प्रदर्शनाची पद्धत. म्हणजे एखाद्या कार्यक्रमात आभार मानायचे असल्यास तेंका देव भले करो म्हंता, असे म्हटले कि झाले. फुटकळ, फाटकळ , चोरलेल्या कविता न वापरता देव बरे करो म्हंता, असे म्हणायचे. आवडली बुवा आपल्याला हि पद्धत.
Wednesday, January 6, 2010
सुशेगाद !
अरोरा टोवेर्स ते सांतान इज (पणजिम) हा प्रवास तसा फार कंटाळवाणा नाही. सकाळी अमृततुल्यची सवय असल्याने सकाळी सकाळी बारच सुरु असतात; हेच तेवढे वेगळेपण. इथे रमलोय. भरीस भर म्हणजे आता महाराष्ट्रातून फोन आला कि काय 'गोवेकर कसे आहात?', असे विचारले कि बरे असा.'.तुम्ही खोयेन असा? असे उलट विचारले कि मग समोरचा गप्प होतो.
पिण्याचा पाण्यालासुधा इथे माशाचा वास येतो, त्यामुळे खाण्याबद्दल फार काही लिहित नाही.
गो मन तक - असे वर्णन एका मित्राने केले होते. तेच खरे आहे. परदेशी पर्यटक, 'मद्य'रात्री यापेक्षा गोवा खूपच वेगळा आहे. पोर्तुगीजांच्या पारतंत्राच्या खुणा जपत, भारतीय अस्मितेची लक्तरे अरबी समुद्राचा वेशीवर लटकलेली मला दिसलीत. त्यात मी 'भायला' ! कुठेही गेलो कि मीच आता मी 'घाटी' असल्याचा परिचय देतो; त्यामुळे पुढे प्रोब्लेम येत नाही. इथल्या भाषेवर, खाण्यावर, 'पिण्या'वर, संस्कृतीवर पोर्तुगिजांचा प्रभाव खूप आहे. एकाचवेळी कोंकणी, पोर्तुगीज शिकता येईल याचा आनंद आहेच. नवे मित्र मैत्रिणी भेटलेत.
वातावरणाशी जुळवून घेत, विरोधकांना टपली मारत हळू हळू काम शिकतोय. भात- तळलेला बांगडा, कढी, आमसुलाचे सार, पापड, लोणचे असे जेवण असल्याने पोटाची चिंता नाही.
इथे सकाळी दिवस लवकर सुरु होतो. साडेतीन वाजता इथे संध्याकाळ होते आणि आठ वाजता मध्यरात्र. बार तेवढे सुरु असतात. सकाळी उठून कोणती दारू घ्यायची आणि कोणता मासा खायचा; याच विचाराने दिवस सुरु होतो. (सध्या तरी माझा नाही.)
समुद्र मात्र धुंद करणारा. अफाट. आपली औकाद पहायची असेल न तर, समुद्रावर या. इथे कळते आपण किती शुद्र आहोत ते.!
मध्ये एकदा बा. भ. बोरकर यांचा गावी जाऊन आलो. मोठा माणूस होता. त्यांचा काळापासून सुरु असलेला कोंकणी मराठी वाद अजूनही सुरु आहे. परकीय आपल्यात भांडणे लावून जातात आणि आपण मुर्खासारखे भांडतो, याला गोवासुद्धा अपवाद नाही. तरीही ' आहे तसा स्वीकारा आणि पाहिजे तसा घडवा' हे सूत्र माझा मनाशी पक्के आहे. वातावरण, खाण्याला सरावलो आहे. माणसांचीही सवय होईल.
गोव्यात रुळण्यासाठी मला मदत करणारे गणाधीश प्रभुदेसाई (पुणे, लोकसत्ता) व जोयना (डीएनए, मुंबई) यांचे आभार!
सध्या तरी आयुष्य 'सुशेगाद'!!!!!!!!!!!
पिण्याचा पाण्यालासुधा इथे माशाचा वास येतो, त्यामुळे खाण्याबद्दल फार काही लिहित नाही.
गो मन तक - असे वर्णन एका मित्राने केले होते. तेच खरे आहे. परदेशी पर्यटक, 'मद्य'रात्री यापेक्षा गोवा खूपच वेगळा आहे. पोर्तुगीजांच्या पारतंत्राच्या खुणा जपत, भारतीय अस्मितेची लक्तरे अरबी समुद्राचा वेशीवर लटकलेली मला दिसलीत. त्यात मी 'भायला' ! कुठेही गेलो कि मीच आता मी 'घाटी' असल्याचा परिचय देतो; त्यामुळे पुढे प्रोब्लेम येत नाही. इथल्या भाषेवर, खाण्यावर, 'पिण्या'वर, संस्कृतीवर पोर्तुगिजांचा प्रभाव खूप आहे. एकाचवेळी कोंकणी, पोर्तुगीज शिकता येईल याचा आनंद आहेच. नवे मित्र मैत्रिणी भेटलेत.
वातावरणाशी जुळवून घेत, विरोधकांना टपली मारत हळू हळू काम शिकतोय. भात- तळलेला बांगडा, कढी, आमसुलाचे सार, पापड, लोणचे असे जेवण असल्याने पोटाची चिंता नाही.
इथे सकाळी दिवस लवकर सुरु होतो. साडेतीन वाजता इथे संध्याकाळ होते आणि आठ वाजता मध्यरात्र. बार तेवढे सुरु असतात. सकाळी उठून कोणती दारू घ्यायची आणि कोणता मासा खायचा; याच विचाराने दिवस सुरु होतो. (सध्या तरी माझा नाही.)
समुद्र मात्र धुंद करणारा. अफाट. आपली औकाद पहायची असेल न तर, समुद्रावर या. इथे कळते आपण किती शुद्र आहोत ते.!
मध्ये एकदा बा. भ. बोरकर यांचा गावी जाऊन आलो. मोठा माणूस होता. त्यांचा काळापासून सुरु असलेला कोंकणी मराठी वाद अजूनही सुरु आहे. परकीय आपल्यात भांडणे लावून जातात आणि आपण मुर्खासारखे भांडतो, याला गोवासुद्धा अपवाद नाही. तरीही ' आहे तसा स्वीकारा आणि पाहिजे तसा घडवा' हे सूत्र माझा मनाशी पक्के आहे. वातावरण, खाण्याला सरावलो आहे. माणसांचीही सवय होईल.
गोव्यात रुळण्यासाठी मला मदत करणारे गणाधीश प्रभुदेसाई (पुणे, लोकसत्ता) व जोयना (डीएनए, मुंबई) यांचे आभार!
सध्या तरी आयुष्य 'सुशेगाद'!!!!!!!!!!!
Subscribe to:
Comments (Atom)