परवा एका जेष्ठ्य राजकारणी नेत्याशी बोललो। लोकशाहीची थट्टा ज्यामुळे होते आहे त्या घराणेशाहीवर। डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील तर राजकारण्याचा मुलगा राजकारणी का नको? असा साक्षात्कार (?) त्यांनी मला करवून दिला. मी पण अगदी आतुर असल्याचा आव आणून त्यांना ऐकत होतो. अर्थात जमलेले सर्व बावळट अशा अविर्भावात ते बोलत होते. त्यांना म्हटले, ''असे असेल तर मग तळागाळातल्या (सतरंज्या उचलणाऱ्या) कार्यकर्त्यांचे काय? त्यांनी आधी तुमच्या आणि आता तुमच्या दिवटयांच्या चरणीच निष्ठा वाहायची? '' मग मात्र ते विधानसभेत बसतात तसे बसले (गप्प). ( ऑफ द रेकॉर्ड - काही वर्षांनी लोकशाही नावाची सर्कस, जनता जनावरे आणि रिंगमास्टर.............! येत्या पाच वर्षात कळेलच म्हणा हि राजकारणातली जुन्याच रक्ताची नवी पिढी काय प्रकाश पडते ते. ) लोकसभा व त्यानंतर लगेचच आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे घराणेशाहीचा मुद्दा फारच चघळला गेला. अर्थात 'राजकारण्यांच्या मुलांमध्ये कर्तुत्व नसते काय?' असे राष्ट्रवादीचे जेष्ठ्य नेत्याला वाटत असेल तर गैर काही नाही. पण साहेब फक्त एका प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही तुम्ही द्याल? चवथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा धडा होता. म्हणे शिवबांनी हिंदवी स्वराज्य, आणि रयतेच्या रक्षणासाठी मिर्झा राजे जयसिंग यांना राज्य देऊ करून स्वतः तुमची चाकरी करीन अशी विनवणी केली होती. त्यावेळी शिवाजी महाराज संभाजीराजांच्या कर्तृत्वासाठी भांडले नाहीत का?''
समाजाच्या हितासाठी अनेक नेत्यांनी वैयक्तिक जीवनात कठोर निर्णय घेतल्याचे स्मरते. भारत स्वतंत्र होत असताना नौखालीत जातीय दंगली शमवणारे गांधी भेटले, 'ऑपरेशन ब्लू स्टार' नंतर अनेकदा सूचना करूनही शीख अंगरक्षक न बदलणाऱ्या इंदिराजीही भावल्या. जे पी यांनी तर त्यांचा पिढीला वेड लावायचे बाकी ठेवले होते. आणि हो राहिलंच मंत्रीपदावरून सबंध राज्याला २०- २० वरून अनिश्चिततेच्या पीचवर उभे करणारे नेतेही यंदाच्या साठमारीत बघायला मिळाले. (तुम्ही ऐकताय ना 'राजे' ?)